मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

पैसेंजरचा प्रवास पाच तासात

पैसेंजरचा प्रवास म्हणजे भलताच त्रासदायक हो. मी सहसा अश्या ट्रेनने कधी जायची हिम्मत करत नाही. परवा सोलापुर ते गुलबर्गा असा पैसेंजरने जायचा योग आला. 'फलकनुमा पैसेंजर' म्हणे त्या गाडीच नाव. हेदराबादला जाणारी ही गाड़ी भलतीच घाण असते, याची कल्पना अमु ने मला आधीच देवून ठेवली होती. कुठेही हात न् लावता सरळ आत जायच दरवाज्याला पण हात लावायचा नाही, भलतीच तारेवरची कसरत. टिकिट काढून चौकशी खिड़कीवरच्या त्या गोल आकाराच्या भोकातून आत डोकावलं. आजकाल खिड़की काचेची असते आणी त्यात उगाच चालणारा माइक वगेरे घेवून दात कोरत एखाद दुसरा बसलेला असतो, ह्या जागेवर बहुदा अर्धवट मुके बहिरे लोक बसवतात अशी माझी पक्की समजूत आहे. पहिल्यांदा विचारलेला प्रश्न त्याना आधी ऐकू जात नाही आणी त्यानंतर ते तोंडातल्या तोंडात काय बड्बड्तात ते आपल्याला कधी पहिल्यांदा ऐकू येत नाही त्यामुळे त्याना एकच प्रश्न दोनदा विचारावा लागतो आणी उत्तरेही दोनदा ऐकावी लागतात. दिवसभर आपण अखंड बडबड करतो अशी ह्यांची चुकीची समजूत असते. 'फलकनुमा पैसेंजर कब आएगी' ह्या प्रश्नाला 'लेट है' एवढच उत्तर मिळाल. 'कितनी लेट है' अस आपण पुन्हा विचारायच मग 'घंटा, आधा घंटा' असे शब्द कानावर येतात. 'कितने बजे आएगी' ह्या प्रश्नावर कोम्पुटर वर बटन आपटून 'ग्यारा बजे' असे शब्द निघाले. म्हणजे गाडीची निघण्याची वेळ होती पावणे अकराची आणी हा म्हणे अकराला येते ? मग निघते कधी ? खिड़की वर पुन्हा विचारणा झाली. दस बीस मिनिट में निकलेगी. चौकशी खिड़की वर चौकशी करून काही उपयोग नसतो. ' घंटा, आधा घंटा ', 'दस बीस मिनिट ' अशी मोघम उत्तरे ऐकून आपण धन्यता मानायाची आणी त्यात जो आकडा मोठा असतो ते खर उत्तर, आणी त्या उत्तरात आणखी काही मिनिट जोडून गाडीची वाट पहायची. घडाळ्या दहा वाजत होते. म्हटलं गाडीला तासभर अवकाश आहे तर सोलापुर फिरून यावं. रिक्श्याने रुजुता ज्या सोसायटीत आधी रहात होती तिथे पोहचलो. तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पूर्वीची जुनी माणसे भेटली.
पापभिरू माणसे आम्ही.. अकराला पाच मिनिटे अवकाश असताना पुन्हा स्टेशनवर आलो आणी गाडीची वाट पहाणं सुरु झालं. गणितात थोडी चुक झाली होती, काही मिनिटे जोडण्याऐवजी मी काही मिनिटे चुकून कमी केली होती. मला रेल्वेच गणित काय माहित. रेल्वेची अनओउंसमेंट ही आणखीन एक समस्या, रेल्वेचे हे गुण लालू पासून ममता पर्यंत ना कुणालाही बदलता आले, ना कधी येतील. सर्वात आधी ते भोंगे अश्या ठिकाणी लावतात की जेथून लोकांना काही ऐकुच जावू नये. एखाद वेळी कुहू कुहू करणारी कोकिळा दिसेल पण हे भोंगे काही दिसायचे नाहीत. नंतर त्यावरून सुरवातीला आणी शेवटी ऐकू येणारं ते टिंग टोंग सोडलं तर बाकी काही ऐकू येत नाही. कसली तरी अन्नौन्स्मेंट झाली आणी एक गाड़ी स्टेशन ला लागली. त्यावर लिहिल होतं ' बीजापुर-सोलापुर-गुलबर्गा-फलकनुमा-काचिगुडा पैसेंजर '. गाडीची अवस्था अमुने म्हटल्याप्रमाण... दरवाज्यावरच्या लोखंडी रौडला हात लावता आत चढलो. खिडकीतुन त्या बर्थवर रुमाल वगेरे टाकले. जागा अड़वल्या. गाड़ी इथून सुटणारी असल्याने रिकामी होती. सामान जागेवर गेलं. किती वाजता गाड़ी निघेल याची वाट पहाण, एवढच करता येतं होतं. अनेक लोक येवून गाड़ी कुठे जाते याची चौकशी आमच्याकडे करत होते. गुलबर्गा - हैदराबाद सांगुन त्याना परत पाठवत होतो. बीजापुर नहीं जाती ? असे प्रश्न अनेक बाणासारखे येत होते. तेंव्हा गुल्बर्ग्याची ढाल पुढे करत होतो. मी म्हटल, की इतके लोक अस का विचारताहेत बर ? गाडीवर तर स्पष्ट लिहिलय ती कुठे जाणार ते. अमुला म्हटलं, की जरा विचारून ये तर खरं.. टी सी ला, की काय भानगड आहे ते. शेवटी की गाड़ी बीजापुर पैसेंजर आहे फलकनुमा नाही. धावत उतरावं लागलं. उतरताना गुल्बर्ग्याची ढाल पाठीवर ठेवली आणी खाली माना घालून प्लेटफोर्म कड़े निघालो. फलकनुमा वर येणार होती. ' गाडी कुठल्या स्टेशनावर येणार ' हा नेहमी एक मोठा प्रश्न असतो. ह्या प्रश्नाच उत्तर ब्रम्ह्देवाला काय खुद्द ती गाडी चालवन्यारयाला पण शेवटच्या क्षणापर्यंत माहित नसतं. मुंबई ला सर्व जण प्लेटफोर्म ऐवजी पुलावर उभे रहातात आणी गाडी ज्या रुलावरून येइल त्या प्लेटफोर्म वर उतरतात इथे सुदैवाने तस काही घडल नाही. घडाळ्यात बारा वाजत आलेले आणी आमच्या गाडीचा काही पत्ता नव्हता. उद्यानएक्सप्रेस येवून गेली, बीजापुर पसेंजर स्टेशनावर लागलेली, नागरकोइल ची अनाउन्समेंट झालेली, आमची कुठेगायब झाली कोण जाणे. 'ती संध्याकाळची कोणार्क पण येवून जाइल तरी आपली येणार नाही', मी उगाचचरफडलो. जीने उतरताना लांबून गाड़ी येताना दिसली. पुन्हा तेच सीटवर रुमाल टाकणे, जागा अड्वणे, धक्के खात गाडीत चढ़णे हे प्रकार झाले. खिड़कीच्या जागा पटकावल्या. नागरकोइल एक्सप्रेस गेल्यावर हलेल गाड़ी - मी अंदाज लावत होतो. कुठून तरी धड धड ऐकू आली. मी म्हटल आली नागरकोइल. खिडकीतुन बाहेर बघितलं तर नुसतं इंजिन धडधड़त गेलं. आता पुन्हा धड धड ऐकू आली. म्हटलं नक्की नागरकोइल. कसल काय एक मालगाडी मुंगीच्या पावलाने चालत आली. आम्हा दिड-दमडीच्या माणसांपेक्ष्या तो करोडो रुपयांचा माल रेल्वेला जास्त प्रिय. साडे बाराची वेळ. नागरकोइल अखेर आली आणी प्रथम ती विजापुर पैसेंजर निघाली त्यानंतर कुठे आम्ही प्रवासाला लागलो. कुठे ते "ग्यारा" आणी कुठे साडे बारा. मघाशी ऐकताना आपली चुक नाही ना झाली अस उगीच वाटुन गेलं.
जोरदार येणा
ऱ्या एन्जिनाच्या शिट्टी ने कान किटले आणी काळा कुट्ट धुर नाकातोंडात गेला. आता लक्ष्यात आलंकी आम्ही बरोबर इन्जिना पासून दुसरया डब्यात होतो. ' झुक झुक झुक झुक अगिन गाडी, धुरांच्या रेषा हवेतकाढी ' गाण म्ह णावस वाटल पण त्या धुरामुळे आवाजच निघेना. इथे धुरांच्या रेषा नव्हत्या तर अनेक वलयेअसलेले मोठाले ढग होते. ह्स्तातल्या पावसाने सर्वत्र हिरवळ झाली होती. नद्या तुडुम्ब भरून वहात होत्या. शेतकरीभाताची शेती कापत होते. सूर्य ढगांच्या आत लपला होतां. मस्त वातावरण होतं, अधून मधून धुरांचे लोळ उठतहोते. गाडीत् कुठे बटाटवडे खा, कुठे मिर्ची भजी चाव आणी तिखट लागल्यावर पाणी..अस चालु होतं. खाता खाता हीगरम नाहीत अस म्हणुन पुन्हा दुसरया कडून तेच विकत घेणे अस करत प्रवास चालला होता.
टिकेकरवाड़ी पहिल ठिकाण, त्यानंतर होट्गी (१२.४०), तिलाठी (१२.५०), अक्कलकोट ( .००), नागसुर (.१५ ), बोरोटी ( .२५ ), दुधनी ( .४० ) करत कर्नाटकात प्रवेश केला. कुलाली (.५० ), गौड़गाव ( .०५ ), गाणगापुर ( .१० ), हुन्सीहडगीळ ( .२५ ), सावळगी ( .२० ), बबलाद ( .४० ) करत पावणेतिनला गुलबर्गा आलं. जस कुठेही हात लावता चढलो होतो तसच उतरलो. शिट्टी च्या आवाजाने कान जवळ पास बंद झालेले आणी धुर खावुन धाप लागलेली तरीही सुखरूप आणी फक्त तास उशिरा पोहचवल्या बद्दल रेल्वेचे मनोमन आभार मानले.